बळीराजा कविता (Baliraja Kavita)

baliraja

बळीराजा कविता

शेतात राबणारा
दुःखात रोज आहे,
जनतेस लुटणारा
सुखात आज आहे!

मातीत घाम गाळून
तो राबतो सदाही
कष्टास नाही त्याच्या
येथे वाव आज आहे!

रक्तास रोज वाहतो
पाण्यासमान मातीत,
त्याच्याच जीवनाशी
अन्याय होत आहे!

घेतो निरोप जाण्यास
सोडूनी जग सारे,
कर्जात बळीराजा
निराश होत आहे!

कळेल कधी तुम्हाला
खुर्चीत बसणारे,
पोशिंदा तो जगाचा
गळफास घेत आहे!

- रामकृष्ण राठोड (पिंपळवाडी)

THE END
Share it
QR Code
Reward
<< Previous
Next >>
Article Directory
Shut Down